महापुराने गिळंकृत केले अनेक संसार

महापुराने गिळंकृत केले अनेक संसार

शिरोळ(प्रतिनिधी)

शिरोळ तालुक्यात मुसळधार पाऊस व त्यामुळे आलेल्या महापुरात तालुक्यातील अनेक गावांनी आपलं सर्वस्व गमावून बसले आहे , अनेकांची घर-संसार या महापुरात वाहून गेले, अनेकांची गुर, गाड्या इत्यादी सगळं या महापुराने गिळंकृत केलं  आहे. तालुक्यातील श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी,खिद्रापूर,बस्तवड राजापूरवाडी,कुरुंदवाड,राजापूर, हेरवाड,यासह 22 गावे  पाण्याखाली गेले होते हजारो घरे पडली आहेत तर मुके जनावरे वाहून गेली.सद्यस्थितीत पूर ओसरू लागला असला तरी पाणी संत गतीने कमी होत आहे ज्या भागात पूर ओसरत आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दलदल झाली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्या ठिकाणी दुर्गंधी प्रचंड प्रमाणात असल्याने नागरिकांना रोगराई ला सामोरे जावे लागत आहे. आसा परिस्थितीमध्ये आरोग्य विभाग या आणि आरोग्य अधिकारी दक्ष राहणे गरजेचे असताना आरोग्य विभाग आणि आरोग्यविभागाचे अधिकारी मात्र महापूरात गायब झाले आहेत तर गेल्या 10  दिवसापासुन तालुक्यातील अनेक गावे अंधारत आहेत.तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा या दोन नद्या पत्रात जाण्यासाठी किमान चार दिवस लागतील पाऊस कमी झाल्यामुळे पूरग्रस्त आपल्या गावी जाऊन पडलेल्या2 घरातील प्रापंचिक साहित्य पाहत आहेत मात्र अनेकांचे संसार या महापूरात वाहून गेल्याने अनेकांच्या डोळ्यातून अश्रूचां महापूर ओसंडून वाहत आहे.

महापुरात हाजारो  हेक्टर पीकक्षेत्र पाण्याखाली गेले.तर मातीचे  घरे जमिनदोस्त झाली हातगाड्या पाण्याखाली गेल्याने अतोनात नुकसान झाले. रस्त्यांवर दहा ते पंधरा फूट पाणी आल्याने मदतकार्यात अडथळे आले. कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांच्या महापुराने शिरोळ तालुक्यास मोठा तडाखा दिल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. पावसाचे थैमान तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने बघता - बघता पुराचे पाणी पात्राबाहेर पडले. कृष्णा व पंचगंगा नदीने रौद्ररूप धारण केले. पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने अनेक गावांना बेटाचे स्वरूप आले. महापुराने हजारो कुटूंबांचे संसार आणि शेतजमिनीतील पिकांना आपल्या कवेत घेतले. शेकडो घरे जमिनदोस्त झाली. शेतीचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. अक्राळ-विक्राळ रुप धारण केलेल्या या महापुराने लोकांचे जगणे मरणप्राय केले. घरे पाण्याखाली गेल्याने प्रापंचिक साहित्याबरोबरच पशुधन वाहून गेले. अशा स्थितीत ग्रामस्थांना यांत्रिक बोटीतून आपला गाव सोडावा लागला. 

गावांला महापुराने वेढा दिल्याने तसेच पाणी वाढू लागल्याने पूरग्रस्तांना घरावरील छताचा, उंच इमारतींचा आधार घेतला. महापुराचे अक्राळ-विक्राळ रुप पाहून निसर्गासमोर शरणागती पत्करलेल्या माणसांना अन् पाण्यासाठी सुरक्षितस्थळी जाण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. गावातील सामाजिक कार्यकर्ते,तरुण मंडळाचे कार्यकर्ते , आणि नागरिकांच्या  मदतीने पूरग्रस्तांची शाळा, मंदिरे, छावणीत स्थलांतर केले होते.