नव्या कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी इंग्लंडची विमानसेवा स्थगित करा - आ. पृथ्वीराज चव्हाण

इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्याने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा विषाणू घातक असून याबाबत ब्रिटनमधील संसदेत तिथल्या आरोग्यमंत्र्यांनीही नवीन विषाणू "आऊट ऑफ कंट्रोल" असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी कोरोना विषाणूच्या नव्या संसर्गावर स्पष्टता येईपर्यंत केंद्र सरकारने तात्काळ इंग्लंडहून भारतात येणारी विमानसेवा स्थगित करावी.

नव्या कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी इंग्लंडची विमानसेवा स्थगित करा - आ. पृथ्वीराज चव्हाण
नव्या कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी इंग्लंडची विमानसेवा स्थगित करा - आ. पृथ्वीराज चव्हाण 

ट्विटद्वारे आवाहन : इंग्लंडमध्ये कोरोनाची नवी लाट,नवीन विषाणू "आऊट ऑफ कंट्रोल" असल्याचे ब्रिटनच्याआरोग्यमंत्र्यांचे मत

 कराड/प्रतिनिधी : 

         इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्याने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा विषाणू घातक असून याबाबत ब्रिटनमधील संसदेत तिथल्या आरोग्यमंत्र्यांनीही नवीन विषाणू "आऊट ऑफ कंट्रोल" असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी कोरोना विषाणूच्या नव्या संसर्गावर स्पष्टता येईपर्यंत केंद्र सरकारने इंग्लंडहून भारतात येणारी विमानसेवा तात्काळ स्थगित करावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटद्वारे केले आहे.

        या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला असून येथे कोरोनाची नवी लाट पसरली आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू "आऊट ऑफ कंट्रोल" असल्याचे ब्रिटनमधील संसदेत तिथल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका लक्षात घेऊन युरोपमधील इतर देशांनी सतर्कता दाखवत इंग्लंडमधून येणाऱ्या सर्व हवाई वाहतुकीसह बोटींद्वारे होणाऱ्या वाहतुकीवरही बंदी घातली आहे. याआधी आलेल्या कोरोना विषाणूवेळी आपल्या देशात उशीरा सतर्कता दाखविल्यामुळे आणि  लॉकडाऊनच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे मोठी जीवितहानी झाली होती.

         तसेच कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला होता. आता कोरोनाच्या नव्या लाटेमुळे  त्याची पुनरावृत्ती न होता भारतावर नवीन संकट ओढवणार नाही, यासाठी सतर्कता दाखवून केंद्र सरकारने तात्काळ इंग्लंडमधून भारतात येणारी विमान वाहतूक स्थगित करावी. तसेच भारतीयांचे जीव वाचविणे प्राधान्य असल्याने केंद्र सरकारने त्यानुसार देशात अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.