देशाच्या विभाजनाचा भाजपचा डाव ; माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण

लव जिहादचा कायदा आणून भाजप देशाचे विभाजन करत आहे: पृथ्वीराजबाबा

देशाच्या विभाजनाचा भाजपचा डाव ; माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण

 

लव जिहादचा कायदा आणून भाजप
देशाचे विभाजन करत आहे: पृथ्वीराजबाबा


सातार/प्रतिनिधीः-


लव जिहादचा कायदा आणून भाजपला देशाचे पुन्हा विभाजन करायचे आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केली. सातार्‍यात
पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली.


यावेळी आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बिहारमधील निवडणूक अटीतटीची झाली. ही सकारात्मक बाब आहे. भाजप नेहमी ध्रुवीकरणाचे राजकारण करते. लव जिहाद
कायदा आणून त्यांना देशाचे पुन्हा विभाजन करायचे आहे. अशा कायद्यांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन विभाजन होईल.ईडीच्या बाबतीत बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ईडीमार्फत कोणाची
चौकशी होणार नाही. फक्त नोटिसा पाठवायच्या आणि घाबरवायचे असे उद्योग सुरू आहेत. दहशतीसाठी अशा यंत्रणांचा वापर केला जात आहे. विरोधकांना टार्गेट
केलं जातं आहे. आमिषे दाखवली गेली. अशा कारवाया ही पक्ष बघून आणि विरोधी पक्षाला मोडण्याकरिता करत आहेत. ज्या बँका इंदिरा गांधींनी राष्ट्रीकृत
केल्या त्या मोठ्या उद्योगपतींना ताब्यात देऊन विक्री करण्याचे काम काम भाजप सरकारचे सुरू आहे, अशी टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.