spot_img
spot_img
spot_img
spot_img

पृथ्वीराज चव्हाण-बाळासाहेब पाटील यांच्यात राजकीय खलबते

कराड/प्रतिनिधीः-
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवत, कराड उत्तर मतदारसंघावर आपलीच पकड असल्याचे सिद्ध केले असताना आज अचानक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवास्थानी येवून त्यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी आगामी होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीवर राजकीय खलबते झाल्याचे समजते.

विधानसभेच्या निवडणूकीत कराड दक्षिण, उत्तर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणूकीमध्ये भाजपाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल आणि भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, रामकृष्ण वेताळ व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवासराव थोरात यांचे एक पॅनेल .सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेल विरोधात उभे राहिले या तिरंगी निवडणूकीत बाळासाहेब पाटलांनी सह्याद्रीच्या निवडणूकीत विधानसभेच्या निवडणूकीचा वचपा काढत सुमारे आठ हजाराच्या मताधिक्याने आपले पॅनले निवडूण आणले. या निवडणूकीदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवास्थानी बाळासाहेब पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर या दोन नेत्यामध्ये सुमारे तासभर सह्याद्रीच्या निवडणूकी संदर्भात चर्चा झाली. मात्र, याचा तपशिल कोणालाही समजू शकला नाही. भाजपाचे आमदार ही दोन-तीन वेळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटले मात्र त्यांनी या निवडणूकीत कोणाच्याही व्यासपीठावर न जाता आपली उघड भूमिका जाहिर केली नाही.

या निवणूकीनंतर आज माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राजकीय खलबते झाले. याचा तपशिल मिळू शकला नसला तरी, होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य स्थितीत राज्यातील राजकारणासंदर्भातही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. येणार्‍या निवडणूकीत या दोन नेत्यांचे सूर जुळणार का? हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या