spot_img
spot_img
spot_img
spot_img

भाजपमध्ये प्रवेशानंतर वैभव दादा पाटलांचा विकास कामाचा धुमधडाका !

भाजपमध्ये प्रवेशानंतर वैभव दादा पाटलांचा विकास कामाचा धुमधडाका !

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट ; दुष्काळी भागांना पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला मिळाला हिरवा कंदील

विटा / शिराज शिकलगार

खानापूर तालुक्यातील खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल व विटा शहराचे माजी आमदार सदाशिवराव (भाऊ )पाटील यांचे सुपुत्र विटा नगरीचे माजी नगराध्यक्ष युवा नेते वैभव दादा पाटील यांनी नुकताच मुंबई येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटीलसह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केल्याने खानापूर तालुक्यातील भाजप पक्षाला तरुण तडफदार युवा नेता मिळाला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वैभव दादांनी आज बुधवारी सांगली येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल या मतदार संघाच्या दृष्टीने महत्त्वाच्या दोन मागण्या मंत्री महोदयांकडे मांडल्या. या दोन्ही मागण्यांवर माननीय मंत्री महोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले व कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना निर्देशही दिले.

वैभव दादा पाटील यांनी सांगली येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर दोन मागण्या मांडल्या. पहिली मागणी टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामगाराबाबत आढावा बैठकीचे आयोजन तर दुसरी मागणी सांगली जिल्ह्यात विविध पाणी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी  भागांना पाणीपुरवठा करण्याची मागणी मंत्री महोदय यांच्याकडे केली. वैभवदादांनी केलेल्या मागणीला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यांच्या कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना निर्देशही दिले. तसेच जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे युवा नेते ॲड वैभव दादा पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याबद्दल स्वागत व अभिनंदन केले. सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे मंत्री महोदय यांनी सांगितले. यावेळी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे उपस्थित होते.

वैभवदादांनी मागणी केलेल्या पाणीप्रश्नाला मंत्री महोदयांकडून हिरवा कंदील !  

माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचे सुपुत्र युवा नेते वैभव दादा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले. वैभव दादांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला आणि बुधवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सांगली दौऱ्यादरम्यान भेट घेऊन परिसरातील दुष्काळी भागातील पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा केली. मंत्री महोदय यांनी तातडीने यासंदर्भात आपले प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन वैभव दादांना दिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या