कराड/प्रतिनिधीः-
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीची स्वप्ने उद्धस्थ केली. याचा सर्वात जास्त फ टका काँग्रेसला बसताना दिसत आहे. अनेकजण काँग्रेसला हात करत भाजपाचे कमळ आणि अजितदादांचे घड्याळ हातात घेत आहेत. याचा धक्का पुणे जिल्ह्यातील मोठे नेतृत्व माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पासून ते रविंद्र धनगेकर आणि खूद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदार संघातील आणि ज्या घराण्याने तब्बल 50 वर्ष अनेकांशी संघर्ष करत काँग्रेसची विचारधारा तेवत ठेवली.अशा माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपूत्र अॅड. उदयसिंह पाटील यांनी काँग्रेसला हात दाखवत अजितदादांचे घड्याळ हातात बांधले. भविष्यात काँग्रेसमधून सुरू असलेली ही गळती रोखणार कोण? आणि कार्यकर्त्यांना दिशा दाखवणार कोण? असे अनेक प्रश्न सध्या काँग्रेसच्या गोटात सुरू असून पृथ्वीराजबाबा पक्षातून होणार गळती रोखण्यासाठी भूमिका घेणार का? वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकतच राहणार.
राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीनंतर महाविकास आघाडीला धक्के बसू लागले आहेत. अनेक पक्षातील वेगवेगळे नेते आपल्या सोईने व आपल्याला मदत करणार्या पक्षात जाण्याची वाट चोकाळत आहेत. खरेतर पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकील्ला म्हणून राजकीय पटलावर गणला जात होता. मात्र यालाच धक्का बसत भाजपाने कुटनीती रचत तो आपलासा केला आहे. हा परिसर शुगर लॉबिचा आणि सहाकार चळवळीचा म्हणून ओळखला जातो. हा पट्टाच भाजपाने म्हणजेच महायुतीने काबीज केला आहे. सातारा-सांगली-पुणे-सोलापूर-कोल्हापूर या जिल्ह्यामधून केवळ काँग्रेसचा 1 आमदार निवडणून आला आहे. तर उर्वरीत आमदार हे महायुतीचे निवडून आले आहेत. यामध्ये दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
विधानसभेच्या निवडणूकीनंतर केवळ चार महिने झाले असतानाच अनेकजण महाविकास आघाडीची साथ सोडत आपल्याला हव्या असणार्या,मदत करणार्या पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. पुण्यातून पहिला धक्का रविंद्र धनगेकर यांनी देत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर त्यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री आनंतराव थोपटे यांचे सुपूत्र आणि तब्बल चारवेळा निवडूण आलेले शिरूरचे माजी आमदार संंग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपणाला संधी असताना दिली नाही. असे ठपके ठेवत भाजपाचे कमळ हाती घेतले. तर कराड-दक्षिणमधील युवानेते अॅड.उदयदादा पाटील-उंडाळकर यांनी पुरोगामी विचार जपत काँग्रेसला बाय-बाय करत राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्या पक्षात प्रवेश करून आपल्या हाती घड्याळ बांधले तर अन्य काहीजण पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू आहे. त्याची चाचपणीही झाल्याचे समजते. यासाठी एका नेत्याने बैठका घेवून खास लोकांशी चर्चा सुरू केली असून ते काँग्रेसला सोडून जाणार का? केवळ चर्चा राहणार का हे पाहण्यासाठी थोडा अवधी जावा लागेल.
आ.अतुलबाबांची राजकीय खेळी जोमात..
आमदार डॉ.अतुल भोसले क्रॉगे्रसचे अनेक नेते आपल्या कंपूत सामिल करूण घेण्यासाठी अनेक ठिकाणी बैठका पार पाडत आहेत आणि उघडपणे थोडे थांबा मग समजेल असे सांगत आहेत. तर ते नुसते बोलत नाहीत तर त्यांनी तश्या घडामोडीही घडवल्या आहेत. विंग जिल्हा परिषदेतील माजी जि.प.सदस्य शंकरराव खबाले यांनी पहिल्यांदा काँग्रेसची साथ सोडली. तर निवडणूकीपूर्वीच मलकापूरातील चार माजी नगरसेवकांना आपल्या बरोबर अतुलबाबांनी घेतले. या पाटोपाठ क्राँग्रेसचे दिग्गज म्हणून ओळखले जाणारे चांदेआप्पा आणि काँग्रेसचे मलकापूर शहराध्यक्ष प्रशांत चांदे यांनीही भाजपात प्रवेश करून अतुलबाबांना साथ करण्याचा निर्णय घेत आ.डॉ.अतुलबाबा भोसले यांनी अन्य काही नेत्यांच्याबरोबर गुप्त बैठका केल्याची चर्चाही मलकापूरात सुरू आहे.
गळती रोखणार कोण?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण हे सध्या वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातून जे जे नेते बाहेर पडले त्यांच्याबाबत कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. स्वतःच्या कराड-दक्षिण मतदार संघात त्यांना उदयदादांनी राष्ट्रवादीत जात चेकमेट केला असताना सुद्धा त्यांनी यावरतीही आपले मत व्यक्त केलेले नाही. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.