रागाने जेवण वाढ असे पतीने म्हटल्यावर हा हल्ला
विटा प्रतिनिधी-
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ( साळशिंगे ) येथे पत्नीस रागाने जेवण वाढ असे म्हटल्याच्या कारणावरून अर्धांगिनी पत्नीने दगड फेकून मारून व हनुवटीवर कांदा कापण्याच्या चाकूने मारून त्याच्या कुण्या हल्ला करून पत्नीने पतीस जखमी केले. तर सासू-सासरा व मेहुण्याने शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून या संदर्भात मारहाण केल्याची फिर्याद पती अमर दिलीप वायदंडे ( वय वर्षे २९. राहणार साळशिंगे). याने विटा पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. हा सर्व प्रकार रात्री साडेदहाच्या सुमारास घडल्याचे विटा पोलिसांना पती अमर वायदंडे यांनी सांगितले. या संदर्भात पल्लवी अमर वायदंडे. सासू हिराबाई उत्तम यादव. सासरा उत्तम पांडुरंग यादव. व मेहुणा मंगेश उत्तम यादव. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे विटा पोलिसांनी सांगितले. पडलेला प्रकाराचा पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत.