पाल येथील तारळी पुलाला पडले भगदाड

पाल येथील तारळी पुलाला पडले भगदाड पुलावरील वाहतूक राहणार बंद,पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली पोलीस प्रशासनाच्या सूचना

पाल येथील तारळी पुलाला पडले भगदाड

पुलावरील वाहतूक राहणार बंद,पोलीस प्रशासनाच्या सूचना

उंब्रज/प्रतिनिधी

पाल ता.कराड येथील तारळी नदीपात्रात असणाऱ्या पुलाला भगदाड पडले आहे.यामुळे तारळे ते काशीळ प्रवासासाठी सदरचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दै प्रीतिसंगमशी बोलताना दिली आहे.

तारळी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस गेल्या दोन दिवसांपासून सुरू असून यामुळे धरणाचे पाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात येत आहे.यामुळे पाल गावात पुराचे पाणी शिरले असल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी प्रशासनाने हलवले असून पुराच्या पाण्यात नदीपात्रातील पूल पूर्णपणे पाण्यात गेल्याने पुलाला भगदाड पडले असल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.श्री खंडोबा मंदिरातही पुराचे पाणी शिरले होते.

नदीपात्रातील तारळे व काशीळला जोडणाऱ्या पुलाला पाल येथे भगदाड पडले असल्याने पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.