अखेर आई आणी मुलाचा  मृतदेह  सापडलेच नाही....  

जोर मधुन एनडीआरफची टिम परतली प्रयत्नांची पराकाष्ठा करुन देखील आई आणी मुलाचा  मृतदेह अखेर  सापडलेच नाही....  

अखेर आई आणी मुलाचा  मृतदेह  सापडलेच नाही....  
अखेर आई आणी मुलाचा  मृतदेह  सापडलेच नाही....  

जोर मधुन एनडीआरफची टिम परतली प्रयत्नांची पराकाष्ठा करुन देखील आई आणी मुलाचा  मृतदेह अखेर  सापडलेच नाही....  

 

वाई / दौलतराव पिसाळ 


वाईच्या  पश्चिम भागातील जोर या गावावर ऐन बेंदुर या सणाच्या दिवशी दि.२२ रोजी दिवस रात्र मुसळधार पाऊस पडत असताना केळाचे नकाड हा डोंगरा  कोसळताना पाहणार्या अनिता पांडुरंग सपकाळ वय ३५ मुलगा सचिन  पांडुरंग सपकाळ वय २० या दोघांनी  आरडा  ओरडा करत वस्ती वरील जवळ पास ३० माणसं घरा बाहेर काढण्यास यश मिळवुन आलेल्या काळाला चकवा देत माणसं वाचविण्या 
साठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण दुर्दैवाने 
डोंगर ऊतारा भरघाव वेगाने  वरुन झाडे दरड आणी मातीचा ढिगारा कोसळून लगतच असणारा पोवाचा ओढ्यातुन    आलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्या बरोबर  मातीच्या लाटा आणी मोठमोठी दरडी आई अनिता यांच्या शरीरावर आदळल्याने क्षणार्धात आई जमीनीवर आदळल्याने त्या  पुराचे पाणी आणी  मातीच्या लाटांन सोबत  वाहुन जात असतानाच सचिन पांडुरंग सपकाळ वय २० या त्यांच्या मुलाने पाहिले आणी त्याने क्षणाचाही विचार न करता आईला वाचविण्या साठी त्या वेगवान मातीच्या लाटेत उडी टाकली पण नियतीला हे मान्य नसल्यानेच काळाने या आई आणी मुलावर झडप घातली आणी ही मायालेकर 
क्षणार्धात धोमबलकवडी धरणातील  मातीच्या ढिगार्या खाली गाडली गेली.


पती पांडुरंग सपकाळ चुलत भाऊ नारायण  सपकाळ यांनी शेकडो  ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या पत्नीचा आणी मुलाचा शोध सुरु केला पण दुर्दैवाने त्यांना आज ११ दिवस  उलटले  तरी ते जिवंत किंवा मृत अवस्थेत सापडले नसल्याने जोर गावावर शोककळा  पसरली आहे. 
 


जिल्हाधिकारी आणी  वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर आणी तहसीलदार रणजित भोसले यांना या गंभीर  घटनेची माहिती मिळताच  या माया लेकरांचा गतीने शोध घेण्यासाठी पुण्यातुन एनडीआरफची टिम मागवली पण जोर गावाकडे जाणारे पुलं वाहुन गेल्याने त्या गावापर्यंत या टिमला मुसळधार पावसा मुळे जलद 
पोहचणे अवघड झाल्याने अखेर या  टिमला घेऊन स्वताच्या जिवाची पर्वा न करता  महिला प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर तहसीलदार रणजित भोसले हे दोन्ही जबाबदार  अधिकारी टिम सोबत  धोम बलकवडी धरणावर पोहचले तहसीलदार धरणाच्या भिंतीवर थांबले   तेथुन पुढे  प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर एनडीआरफच्या  बोटीव्दारे या जवानांना   घेऊन जोर गावातील भर पाऊसात घटना स्थळावर दाखल झाल्या .
 आणी शोध मोहीम सुरू झाली पण मृतदेह हाती लागले नाहीतपण वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर यांनी हार न मानता हे मृतदेह शोधुन काढण्या साठी पुन्हा   दि.२९ जुलै रोजी आणखी एक २४ जवानांची एक टिम मागवून पुन्हा शोध मोहीम सुरू केली होती त्या जवानांनी दोन पोकलेन मशीनच्या साह्याने गेली दोन दिवस मृतदेह शोधण्या साठी  अतिशय परिश्रम घेतले पण धरणात गाळाचे आणी खोलीचे प्रमाण जास्त असल्याने पोकलेन मशीन गाळात कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने या जवानांनी दि.३० च्या  रात्री  शोध मोहीम थांबवुन परत जाण्याचा निर्णय 
घेतला आहे त्या मुळे बेपत्ता असलेल्या  सौ.अनिता पांडुरंग सपकाळ वय ३५ आणी मुलगा सचिन पांडुरंग सपकाळ वय २० हि दोन्ही माया लेकर जिवंत आहेत कि त्यांचा मृत्यू झाला आहे हे सांगणे सध्या तरी वाई महसूल प्रशासनाला सांगणे अवघड आहे