सोशल मीडियावरून आगी लावणारांचा शोध घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई साठी कंबर कसली

सोशल मीडियावरून आगी लावणारांचा शोध घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उंब्रज/प्रतिनिधी

सोशल मीडियावरून आगी लावणारांचा शोध घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


१) संकट टळलेले नाही,लॉक डाउन कायम आहे.

२) ही सूट फक्त ट्रायल आहे.

३) लॉक डाउन उठवल्या सारखी गर्दी होत आहे असे चालणार नाही अन्यथा कडक निर्बंध आणावे लागतील

४) शिथिलता आहे बंधनमुक्त झालो नाही

५) साधूंच्या बाबतची दुर्दैवी घटना दादरा नगर हवेलीच्या सीमेलगत घडली आहे पालघर जिल्ह्यातील असली तरी दुर्गम भागातील आहे चोर आले या गैर समजुती मुळे सर्व प्रकार झाला आहे.

६) रात्री १२ वाजताची घटना आहे निर्जन आणि दुर्गम परिसरात एस पी तिथे पोहचले होते १६ ला रात्री घटना घडली १०० च्या वर आरोपी आहेत ५ आरोपी आता तुरुंगात आहेत धर्मात आग लावण्याचे काम करू नये ९ अल्पवयीन मुले सुद्धा आहेत त्यांना शिक्षा केल्याशिवाय महाराष्ट्र सरकार गप्प बसणार नाही

 

मुख्यमंत्री सचिवालय ( जनसंपर्क कक्ष )
दि २० एप्रिल २०२० 

*पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये* 
*सर्व हल्लेखोर तुरुंगात, सीयडी कसून तपास करीत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*   

मुंबई दि : पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र  या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते.
सध्या आम्ही कोरोनाचे युद्ध नेटाने लढत आहोत. काही जण या घटनेवरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून वातावरण तापवण्याचा प्रयतन करीत आहे मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
या घटनेवर अधिक भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की १६ तारखेस कासा पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी हा घृणास्पद प्रकार घडला तेथून अवघे काही मीटर अंतरावर दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाची सीमा सुरु होते. 
संबंधित साधू आणि त्यांच्याबरोबरची मंडळी या सीमेवरून जात असतांना तेथील पोलिसांनी एवढ्या मध्यरात्री त्यांना अडवून परत पाठवले आणि ते परतत असतांना या दुर्गम ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला गेल्या काही दिवसांपासून त्या भागात पसरलेल्या अफवेमुळे गैरसमजुतीने झाला. हा भाग पालघर पासून ११० किमी अंतरावर आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय तातडीने याठिकाणी धाव घेतली आणि दिवसभरात १०० पेक्षा जास्त लोकांना पकडले , त्यात ९ अल्पवयीन मुले असून त्यांना रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित हल्लेखोर तुरुंगात असून अतिशय कठोर कारवाई करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. 
दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा याप्रकरणी निलंबितही केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की माझे गृहमंत्री त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणे झाले आहे. याठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे असे आपण त्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांवर देखील या जमावाने हल्ला केला तसेच त्यांच्या वाहनांची नासधूस केली असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.